जळगाव
खोटेनगर भागात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचा निमखेडी शिवारात गिरणा पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ११.३० च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव शहरातील खोटेनगर भागात राहणारा शुभम हिरालाल राजपूत (पाटील) वय २६ हा तरुण शनिवारी सकाळी निमखेडी शिवारात गिरणा नदीत अंघोळीला गेला होता. यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना ११.३० च्या सुमारास घडला. जिल्हा रुग्णालयात त्याला आणले असता सीएमओ डॉ. विसपुते यांनी मृत घोषित केले.