कत्तलीसाठी नेणाऱ्या १३ गुरांची सुटका

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस गुरांची तस्करी करण्याचे प्रमाण वाढतच आहे. गुरांच्या कत्तलीच्या उद्देशाने  मोरव्हालकडून रावेरच्या दिशेने येणाऱ्या दोन महेंद्र पिकअप गाडयांना पाल पोलिसांनी पकडले आहे. यात तब्बल  १३ गुरांची सुटका करण्यात आली असून त्यांना जळगाव येथील बाफना गौ-शाळेत रवाना केले आहे.

मोरव्हाल नजिक सापळा रचुन दोन महेंद्र पिकअप एमएच ०४ जिएफ १८६० व एमएच ०४ जिएफ ८७६७ या दोन्ही गाड्या पकडण्यात आले. या दोन्ही गाड्यांमधून सुमारे १३ गुरांची सुटका करण्यात आली आहे. या गुरांना कत्तलीच्या उद्देशाने  कोंबुन नेले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सदर  कारवाई फौजदार राजेंद्र राठोर, पो कॉ दिपक ठाकुर, पो कॉ नरेंद्र बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे. मध्य प्रदेशातुन मोठ्या प्रमाणात पाल मार्गे गुरांची तस्करी होत असते याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुप्रेमी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.