नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज लोकसभेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मोदी सरकारला केली.
गेल्या वर्षभरापासून कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात जवळपास ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आणि शेतकऱ्यांची माफी मागून कृषी कायदे मागे घेतले. त्यांची चूक असल्याचे त्यांनी मान्य केले होते.
We found out that Punjab Govt has given Rs 5 Lakh compensation for around 400 farmers; also provided jobs for 152 of them. I have the list. We have made another list of 70 farmers from Haryana. Your govt says that you don't have their names: Congress MP Rahul Gandhi in Lok Sabha pic.twitter.com/mlnbZPlAs5
— ANI (@ANI) December 7, 2021
राहुल गांधी म्हणाले की, ३० नोव्हेंबरला कृषीमंत्र्यांना विचारले होते की, आंदोलनात किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता? त्यानंतर ते म्हणाले होती की, माझ्याजवळ कोणतेही आकडे नाही आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेत मृत शेतकऱ्यांची यादी सादर केली आणि पुढे म्हणाले की, पंजाब सरकारने ४०० शेतकरी कुटुंबियांना ५ लाख रुपये दिले आहेत. याशिवाय १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला सरकार नोकरी दिली आहे.
याबाबत माझ्याकडे यादी आहे. याव्यतिरिक्त आम्ही हरयाणाच्या ७० शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. परंतु तुमचे सरकार म्हणते की, आपल्या जवळ शेतकऱ्यांची यादी नाही. मला असे वाटते की, सर्व शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत आणि मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरी दिली पाहिजे. पण आता सरकारने नुकसान भरपाई आणि रोजगाराबाबतची माहिती द्यावी, अशी मागणी केली.
पण यानंतर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तर तात्काळ देण्याची मागणी काँग्रेस खासदारांनी केली आणि उत्तर न मिळाल्याने काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.