Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»यावल तालुक्यातील सर्व आधार केंद्र बंद झाल्याने गोंधळ
    जळगाव जिल्हा

    यावल तालुक्यातील सर्व आधार केंद्र बंद झाल्याने गोंधळ

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 25, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

    प्रधानमंत्री किसान सम्मान निधी २०२२ साठी ई केवायसीसाठी शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असल्याने सर्व आधार केंद्रांवर वयोवृद्ध शेतकरी बांधव तसेच वयोवृद्ध महिला मंडळीची धावपळ सुरु होती. कारण ई केवायसीसाठी शासनाने ३१ मार्च ही शेवटची तारीख दिल्याने नागरिक आपआपल्या परीने जवळच्या आधार केंद्रांत जाऊन आधारशी मोबाईल नंबर लिंक करत होते.

    मात्र शुक्रवारी सकाळी लोकांनी आधार लिंकसाठी नंबर लावून बसले असता १० वाजता त्यांना सांगण्यात आले की, आधार कार्डच्या मुख्य कार्यालयातून आमचे सर्वर बंद करण्यात आले आहे. त्यावर तालुक्यातील सर्वच ठिकाणी आधार मशिन बंद करण्यात आल्याने लोकांची चांगलीच पळापळ होत आहे.

    एकीकडे ३१ मार्च ही अखेरची तारीख दिली तर दुसरीकडे आधार केंद्र बंद असल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. शेतकरी राजाला आसामानी संकटामुळे वारंवार अडचणीना सामोरे जावे लागते त्यात शासनाकडून तुटपुंजी मदत योजनेमार्फत मिळते खरी मात्र अशा अडचणीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने यावर तात्काळ मार्ग काढून तालुक्यातील सर्व आधार केंद्र सुरू करण्यात यावे, याकडे जिल्हाधिकारी जळगाव, यावल तहसिलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन समस्या सोडवावी अशा व्यथा प्रसार माध्यामाकडे आधार केद्र चालकांनी मांडल्या आहे.

    कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोनवर्ष आधार कार्ड केंद्र बंद होती. गेल्या काही महिन्यापूर्वी शासनाच्या सर्व नियम अटी मान्य करून बँक गॅरेंटी विविध प्रमाणपत्रे सादर करून आधार केंद्र सुरू झाले मात्र त्यातही एकीकडे केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे आधार केंद्र चालकांना विविध अडचणी तांत्रिक बांबीना सामोरे जावे लागते त्यात एका छोट्याशाचुकीसाठी आधार ऑपरेटर ब्लॅक लिस्ट होणे असे प्रकार घडत असतात.

    तसेच नकळत झालेल्या चुकांमुळे विविध प्रकारचा दंड भरावा लागतो, त्यामुळे सर्व लिगल काम करूनही लोकांची शिवी दमदाटी बोलणी ऐकुन ही आम्ही लोकांना सर्व प्रकारे सेवा देत असतो, सेवा देऊनही जेव्हा शासनाला पटेल तेव्हा केंद्र बंद करून आम्हालाही विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आधार ऑपरेटर यांनी सांगितले.

    Confusion due to closure of Aadhaar center manvel Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif