अनैतिक संबंधांचा संशय, पतीने पत्नीसह चौघांना संपवलं

0

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत जाऊन चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावातून समोर येत आहे. ही घटना मंगळवारी १९ डिसेंबरला रात्री ११ वाजता घडली. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पंडित भोसले (सासरा) सुनील पंडित भोसले (मेहुणा) ज्ञानेश्वर पंडित भोसले (मेहुणा), रेखा गोविंदा पवार (पत्नी) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर रुखमा पंडित भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.याप्रकरणी पोलिसांनी जावयाला ताब्यात घेतल असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदा वीरचंद पवार (रा. कळंब), असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंदा याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्याचे पत्नीसोबत सतत भांडण होत असत या भांडनानंतर आरोपीची पत्नी माहेरी निघून गेली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी मंगळवारी रात्री ११ वाजता थेट सासरवाडीत पोहचला.

तिरझडा गावात गेल्यानंतर आरोपीने बायको, सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांची निर्घृणपणे हत्या करून आरोपी गोविंदा फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.