विराट कोहलीनंतर आता ‘हा’ स्टार फलंदाज इंग्डंलविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते. यातले दोन दोन सामने खेळवण्यात आले ऑन तीन सामने शिल्लक आहे. पण त्याआधीच टीम इंडियावर नवं संकट ओढवलं आहे. स्टार फलंदाज विराज कोहली संपूर्ण मालिकेत खेळणार नाही. त्यापाठोपाठ आता आणखी एक फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडिया मोठा धक्का बसलाय. याआधीच मोहम्मद शमी, विराट कोहली, रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर झालेत.

स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर 

टीम इंडियाचा मधल्या फळातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रेयस अय्यरच्या पाठीची दुखापत बळावली आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित तीन सामने तो खेळू शकणार नाही. हैदराबाद आणि विशाखापट्टणम कसोटीत श्रेयस अय्यरचा प्लेईंग-11 मध्ये समावेश आहे. पण दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडिया व्यवस्थापनाशी आपल्या दुखापतीबद्दल चर्चा केली. खेळपट्टीवर जास्तवेळ फलंदाजी करताना पाठिवर ताण येत असल्याचं त्याने संघ व्यवस्थापनाला कळवलं आहे. मोठी फटकेबाजी करताना अय्यरच्या पाठिवर आणि मनगटावर जोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.