दुचाकींसह २ घरांचे नुकसान ; सुदैवाने जीवित हानी टळली
जळगाव ;- शहरातील मेहरूण परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या श्रीराम मंदिर चौकात आज दुपारी साडेबारा वाजता आलेल्या जोरदार वादळी वार्याने शंभर वर्ष जुने वटवृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसून भगवान लाड आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार रघुनाथ वाणी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे.
तसेच दोन दुचाकींचे नुकसान झाले . शनिवार ३ रोजी वाट पौर्णिमा असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती . मात्र आज आलेल्या वादळी वार्याने १००० वर्ष जुने झाड कोसळले आहे . राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी वृक्ष मुळापासून उखडला गेला असून ते हटविण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले .