वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शहरातील सरस्वती नगरामध्ये एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे. सायंकाळच्या वेळी जेवण झाल्या नंतर ५ वर्षीय मुलगा आईला “मी अंगणात खेळायाला जातो ग” सांगून घरा बाहेर गेला. मात्र बराच वेळ झाला तरी घरात आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी काळजीने सर्वदूर शोधा शोध सुरु केली. दरम्यान शोध घेत असतांना पाण्याचा कुंडात बघताच समोरच्या दृश्याने वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सरस्वती नगर मधील रहिवाशी हेमेंद्रकुमार रोशनभाई बडगुजर हे आपल्या दोन मुलं व पत्नी सोबत वास्तव्यास असुन तालुक्यातील बोहर्डी येथील खासगी शैक्षणिक संस्थेत कामाला आहे. दि २० मंगळवारच्या संध्याकाळच्या वेळी घरातील सर्वानी जेवण एकत्र केल्यानंतर श्री (कर्णव) (५) हा मी अंगणात खेळतो ग आई ! असे सांगून गेला. तर वडील कुलर मध्ये पाणी भरत होते. बराच वेळ गेला तरी श्री घरात का आला नाही या काळजीने आई वडील त्याचा शोध घेऊ लागले. मात्र त्याची जास्तस चिंता वाटत असल्याने शेजार्यांच्या घरी जाऊन चौकशी करीत होते. त्याची खेळण्याची छोटी सायकल व चप्पल घरीच असल्याने तो घरातच असल्याची शंका आली. दरम्यान अचानक लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने सर्व त्या दिशेने धावले मात्र काहीच दिसले नाही तेवढ्यात कोणीतरी पाण्याचा हौद पाहण्यास सांगितले. हौदाचे झाकन उघडून डोकावुन पाहिले तरी काहीच दिसत नव्हते तेव्हा एकाने हौदात उतरून पाहिले असता त्याच्या पायाला कसलातरी स्पर्श झाल्याने त्याने पाण्यात हात घालून बाहेर काढून पहिले तर तो “श्री”च निघाला. हे दृश्य पाहताच आई वडील अगदी सुन्न झाले होते. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मयत श्री (कर्णव) याचे वडिलांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.