ओझरखेडा येथे एकाची नैराश्यातून आत्महत्या

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव-भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शेतकर्‍याने नैराश्यातून विषारी पदार्थ सेवन करुण आत्महत्या केल्याची घटना दि ८ गुरुवारच्या संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. ओझरखेड येथील शेतकरी संदिप त्र्यबक नेमाडे ( ४५ ) हे नेहमी प्रमाणे गुरुवारच्या सकाळच्या सुमारास शेतात जाऊन दुपारी घरी परत आल्या नंतर आपल्या घराच्या मधल्या खोलीत गेले मात्र संध्याकाळ झाली तर खोली बाहेर आले नाही म्हणून घरातील पत्नी व इतरानी जेवनासाठी आवाज दिला, मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईक व शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता संदिप नेमाडे हे काहीतरी विषारी द्रव्ये सेवन करून अथुरणावर पडलेले होते त्यांना उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मयत संदिप यांच्या पश्च्यात पत्नी एक मुलगा, एक मूलगी आई-वडील असा परिवार असून त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी नैशातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जाते, या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अशोक चावदस नेमाडे यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.