कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी दंगल झाली असून, कोल्हापूर दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. आता परिथितीत सुधार होऊन पूर्वपदावर येत आहे. कोल्हापुरात झालेल्या दंगलीला आळा घालण्यासाठी इंटनेर सेवा बंद करण्यात आली होती. परिथिती पाहता आता इंटरनेट सेवा पुर्ववत करण्यात आली आहे. आज सकाळी १० च्या सुमारास इंटरनेट सेवा सुरु झाली. विविध टेलिकॉम कंपन्यांनी सकाळी १० वाजेपासून इंटरनेट देण्यास सुरुवात केली. कोल्हापुरातील तणावानंतर सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले होते.
झालेली दंगल अजून आक्रमक होऊ नये यातही हि काळजी घेण्यात आली होती. औरंजेबच उद्दात्तीकरण केल्याचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याच्या घटनेनंतर बुधवारी कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी कोल्हापूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आणि दैनंदिन व्यवहार सुरळीतपाने सुरु झाले.