Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
    उत्तर महाराष्ट्र

    काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर : – पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या फत्तेपूर दूरक्षेत्राच्या हद्दीतील वाकडी गावात वजन काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यासह ट्रकचालक, दलाल आणि हमाल, मापाडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

    वाकडी येथे वडगाव सद्दो येथील कापूस दलाल नाना चिंधू कोळी याच्या मध्यस्थिने विलास देवराम जोशी यांचा ३५ क्विंटल कापूस हा २७ क्विंटल ९० किलो भरला. आनंदा बुढन जोशी यांचा ३० क्विंटल कापूस प्रत्यक्षात २० क्विंटल ४० किलो मोजण्यात आला. गोकुळसिंग राजपूत यांचा ५४ क्विंटल कापूस ४० क्विंटल ८० किलो भरला. तर दगडू हरी लोखंडे या शेतकऱ्याचा कापूस तोल काट्यानुसार १२ क्विंटल मोजण्यात आला होता. मात्र, त्याला तोल काट्यात तफावत असल्याची शंका आल्याने त्यांनी तोल थांबवून मापाऱ्यास रंगेहाथ पकडले.

     

    यामुळे शेतकरी संतापल्याने गोंधळ उडाला. याचाच फायदा घेत मापाडी, हमाल यांनी पळ काढला. अखेर शेतकऱ्यांनी कापसासह टूक फत्तेपूर पोलिसांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी दगडू लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कापूस व्यापारी अभिजीत रविंद्र साळुंके (रा.. नकाणेचित्तोड, धुळे) याच्यासह ट्रक चालक सुरेश बुधा मोरे (पारोळा), दलाल नाना चिंधू कोळी (वडगाव सद्दो, ता. जामनेर) तसेच १० हमालांविरूद्ध पहूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पो.नि. सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात हे. कॉ. किरण शिंपी, प्रवीण चौधरी, दिनेश मारवडकर, पो. कॉ. अरुण पाटील, गनी तडवी, राहूल जोहरे, मुकेश पाटील करत आहेत.

    #crime #fraud
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif