लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत यंदाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट २०२२ सादर केला. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. देशाची अर्थव्यवस्था सावरत असून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं निर्मला सीताराम यांनी सांगितलं.
कोरोनाच्या मंदीतून सावरणा-या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पातून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या नवीन लोककल्याणकारी योजना तयार करण्यात आल्या आहेत. देश, महाराष्ट्र तसेच आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी काय तरतुदी करण्यात आल्या आहेत. आणि या अर्थसंकल्पाचे नेमकं काय पडसाद पडतील याची सविस्तर माहिती जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेषदादा पाटील थेट संसदेतून देणार आहेत. तसेच या अर्थसंकल्पाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यासाठी चार्टड अकाउंट पंकज दारा आणि शेअर ब्रोकर शामकांत वाणी देखील आपल्या सोबत जुळणार आहेत. म्हणून प्रत्येक नागरिकाने पहायलाच पाहिजे. लोकशाही ~ लोकलाईव्हवर आज दुपारी २ वाजता.
लाईव्ह पाहण्यासाठी लिंक-
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/lokshahilive
युट्युब लिंक : https://www.youtube.com/loklive/