उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. तिथे शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित आहेत. तसेच ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे..  

– शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.

– लोकशाही वाचवा, चारही स्तंभांनी एकत्र या.

– हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.

– मतदारांचा लोकशाही वरचा विश्वास उडेल.

– लोकशाहीचा बाजार थांबवा.

– मतदारांच्या मतांचा आदर करा.

– माझ्या पाठीत खंजीर खुपसला, तो मुंबईच्या काळजात नको.

– आरेचा निर्णय बदल्याने अतीव दुःख.

– तथाकथित शिवसैनिकाला भाजपने मुख्यमंत्री केलं.

– तुमचा राग माझ्यावर आहे, तो राग मुंबईवर काढू नका.

– आज फेस टू फेस बोलण्याचा आनंद.

– नव्या सरकारचं अभिनंदन.

–  दोन – तीन विषय मनातले मांडायचे आहे.

– जे आज केलं ते अडीच वर्षांपूर्वी का केलं नाही ?.

–  तेव्हा नकार दिला, आता असं का केलं ?.

– ठरल्याप्रमाणे केलं असतं तर मला मुख्यमंत्री व्हावं लागलं नसतं.

– .. तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता.

– कांजूरमार्गचा निर्णय कायम रद्द राहू द्या.

– मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.