मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जनतेशी संवाद साधताना त्यांनी घोषणा केली. शिंदे यांनी बंड केल्यामुळे सरकार अल्पमतात आले, त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे सरकार कोसळले हे आता स्पष्ट झाले आहे.