नागरिकांनी मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा – सुनिल पाटील

0

जळगांव: – महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजना -20२३ दोन टप्पांमध्ये जाहिर केलेली असुन पहिल्या टप्यात हि योजना दि. ०१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील नोंदणीकृत / अनोंदणीकृत निष्पादीत दस्तऐवजांसाठी देय असणा-या मुद्रांक शुल्कापेक्षा कमी शुल्क भरुन झालेले दस्तऐवजांना होणा-या वसुलीस पात्र मुद्रांक शुल्क व त्यावरील दंडाला लागु केलेली आहे. पहील्या टप्यामध्ये सदर योजना १ डिसेबर-२०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असुन त्यात मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड मध्ये भरघोस सूट/ माफी देण्यात आलेली आहे तरी मुद्रांक शुल्क व दंड सूट/माफी योजनेचा लाभ पहिल्या टप्यामध्ये घ्यावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी लोकशाहीच्या विशेष संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

ज्यांच्या 7/12 उता-यावर इतर अधिकारामध्ये मुद्रांक शुल्काचे बोजे बसविण्यात आलेले आहेत त्यांनी तालुक्याच्या दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. या योजनेचा लाभ पहिल्या टप्पयात 31 जानेवारी 2024 पर्यत घेऊन भविष्यात होणा-या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 46 (महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 च्या कलम 176 नुसार) वसुली कायद्यानुसार नागरिकांना सक्तीची कारवाई टाळण्याची हि संधी नागरिकांना उपलब्ध झालेली आहे.

या अभय योजनेत पहिल्या टप्प्यात २५ टक्के तर दुसर्या टप्प्यात २० टक्के सूट देण्यात आली असून शास्तीमध्ये ९० टक्क्यांपर्यंत सूट आहे. यासाठी विहित नमुन्यात अर्ज , प्रतिज्ञापत्र सादर करावेत,
तरी मुद्रांक शुल्क व दंड देय असणा-या नागरिकांनी त्वरीत या अभय योजनेचा फायदा घेऊन मुद्रांक शुल्क भरावे आणि यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगांव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहिला मजला किंवा नजिकच्या दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधाता असे आवाहन मुद्रांक जिल्हा अधिकारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.