हजारो मुलांचे भविष्य पाण्यात ? विद्यापीठाचा अजब निर्णय !

0

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सध्या पावसाने संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही जोरदार हजेरी लावली असून सर्वत्र त्याचा जोर कायम आहे. त्यामुळे कित्येकतरी गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून येत आहे. त्यातच सध्याचा हा काळ विद्यापीठांच्या परीक्षांचा देखील आहे.

विदर्भातही सर्वत्र पावसाने जोरदार थैमान घातले आहे.त्यामुळे तेथील अनेक गावांचा संपर्क तुटला असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा मात्र सुरू आहेत. नागपूर विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा ही ८ जूनपासून सुरू आहे. विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेमध्ये गैरहजर राहिल्यास त्याची पुनर्परीक्षाच होणार नाही असे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात सध्या सर्वत्र पावसाने थैमान घातले असून पूरपरिस्थिती व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार नसेल तर त्यांची परीक्षा कधी होणार? व त्यांच्या पुढील शैक्षणिक भविष्याचे होणार तरी काय ? असा सवाल चौफेर उपस्थित केला जात आहे. तसेच पूर परस्थितीचा विचार करता विद्यापीठाने तूर्तास परीक्षा स्थगित करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.