Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ग्रामीण भागातील जनता लालपरीच्या प्रतीक्षेत
    जळगाव

    ग्रामीण भागातील जनता लालपरीच्या प्रतीक्षेत

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 24, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आगारातील कर्मचाऱ्यांची संपात उडी घेवून आज सुमारे चार महिन्याच्या जवळपास कालावधी लोटला आहे. अनेक बसेस आजही आगाराच्या आवारात उभ्या आहेत. तर बोटावर मोजण्यात इतक्याच एस.टी. रस्त्यावर धावत आहे. आगारातर्फे शहरी भागात काही गावांसाठी फेऱ्या सुरु करण्यात आल्या असल्या तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना व नागरिकांना खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

    एस.टी. महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हा संप मिटलेला नाही. संपावर तोडगा निघत नसल्याने काही कर्मचारी कामावर रुजू होत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. संपापुर्वी या विद्यार्थ्यांना बसेसचा प्रवासासाठी आधार होता. मात्र बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना शहरातील विद्यालय, महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्या परीक्षा कालावधी सुरु असून मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. खासगी वाहनातून अधिक पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील प्रवाशांची झाली आहे.

    त्यामुळे बससेवा केव्हा पूर्ववत सुरु होईल याची त्यांना प्रतीक्षा लागली आहे. नियमित बसने प्रवास करणारे प्रवासी, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी विद्यार्थी बसचा प्रवास करण्यासाठी पासचा उपयोग करतात. मात्र तीन चार महिन्यापासून सुरु असलेला संप मिटला नसल्याने अनेकांनी काढलेल्या पासची मुदत आता संपल्याने पास वाया जाऊन त्या रद्दीत टाकाव्या लागत आहे.

    शिवाय विद्यार्थिनींना मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत पास मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक मुलीला बाहेर शिक्षणासाठी पाठवितात. परंतु बस बंद असल्यामुळे शाळेत जाणे गरजेचे असल्याने खासगी वाहन चालकांना पैसे देऊन शाळेत पाठवित आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

    #maharashtra jalgaon Rajinikant Patil ST Workers Strike
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif