जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
ओमसाई बहुउद्देशीय संस्था जळगाव अंतर्गत श्री ओमसाई मित्र मंडळ आयोजित जळगाव ते शिर्डी पालखी पदयात्राची सुरुवात दि. २८ डिसेंबर रोजी बळीराम पेठमधील साईबाबा मंदिर येथून झाली.
दि. २८ डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत आयोजित या पालखी पदयात्रेची सुरुवात सकाळी साईबाबांच्या मूर्तीस अभिषेक, पादुकांचे पूजन व आरती मा. आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्रीताई महाजन, मा. महापौर नितीन लढ्ढा, नगरसेविका शोभाताई बारी, लकी टेलर, सुरज झंवर यांच्या हस्ते करून पालखीचे प्रस्थान शहरातील प्रमुख महामार्गावरून करून पालखी सायंकाळी पाळधी येथे पोहचली.
सदर पालखी पदयात्रेसाठी रवींद्र हसवाल, किशोर देशमुख, विजय झंवर, गजानन बोरकर, गोपाल बारी, आशिष पाटील, राजू पाटील यासह असंख्य भाविक उपस्थित होते.