रुद्राक्ष महोत्सवात गोंधळ ! महाराष्ट्रातील 3 महिला बेपत्ता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशातील सिहोरमधील कुबेरेश्वर धाम येथे महाशिवरात्री निमित्त मोफत रुद्राक्ष वाटप महोत्सवात मोठी चेंगराचेंगरी झाली. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. प्रचंड गर्दी झाल्याने यावेळी परिस्थिती अनियंत्रित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.

या ठिकाणी देशभरातून लाखो लोक जमा झाले आहेत. वाहनांच्या वीस किलोमिटरहून अधीक रांगा लागल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून देखील हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. याठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने गर्दीत महाराष्ट्रातील या भाविक महिलांशी संपर्क तुटला आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील लोक सध्या बेपत्ता असल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत.

दरम्यान तीन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडून खामगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. सिहोरला गेलेल्या या महिलांशी कुठलाही संपर्क होत नसल्याते या तक्रारीत नातेवाईकांनी सांगितलं. या महिला वाडी, सुटाळा खुर्द येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.