विवाहानंतर तीन आठवड्यातच नववधूचा मृत्यू

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील रहिवासी असलेल्या अंकुश सावदेकर (रा. वाणीगल्ली, रावेर) हे यावल येथील न्यायालयात नोकरीला आहेत. १७ एप्रिलला त्यांचा विवाह नशिराबाद येथील दिलीप वाणी यांची कन्या गौरी यांच्याशी संपन्न झाला. विवाहानंतर पती – पत्नी वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनालाही गेले. मात्र ३० एप्रिलला गौरीच्या मेंदूत रक्तस्राव झाला आणि ब्रेन हॅमरेजमुळे तिचा उजवा हात आणि पाय निकामी झाला.

शर्थीचे प्रयत्न पडले अपुर्ण

जळगाव येथे उपचारानंतर गौरीला मुंबई येथील नायर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. भक्कम आर्थिक स्थिती नसतांनाही अंकुश यांनी उपचाराचे आणि पत्नीला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काही समाज बांधवांनीही त्यांना मदत केली. परंतु गुरूवारी (५ मे) मध्यरात्री त्यांचे मुंबईत हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

तीन आठवड्यांचा संसार

अंकुश सावदेकर यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले असून त्यांच्या आई येथील अंगणवाडीत सेविका म्हणून काम करतात. जेमतेम आर्थिक स्थिती असतांना विवाहानंतर अवघ्या ३ आठवड्यातच दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईहून रात्री उशिरा त्यांचे पार्थिव रावेर येथे आणण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.