लोकशाही न्यूज नेटवर्क
धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) पळासनेर (Palasner) गावजवळ कंटेनरच्या ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला असून अपघातात पंधरा ते वीसजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. मृतांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हेगाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येते. याच गावाजवळ साधारणतः दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. कंटेनर महामार्गावरून जात असतांना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.