लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई ; राज्यातील विजेच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे – त्यामुळे आता राज्याला २५०० अतिरिक्त मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे
यासाठी राज्यात सौर ऊर्जा पार्कची उभारणी केली जाणार आहे – सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास , आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे
काय सांगितले राज्य सरकारने ?
अपारंपरिक ऊर्जेसाठी १७३६० मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प २१ मार्च २०२५ पर्यंत विकसित करण्यात येणार असून , यापैकी १२९३० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.
राज्यात सध्या ९३०५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून , २१२३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत – असे राज्य सरकारने सांगितले