पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मालवाहू रिक्षाच्या धडकेत मृत्यू

0

जळगाव : – रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्याला भरधाव मालवाहतुक करणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याची घटना दि. २९ मार्च रोजी स्मशानभूमीरोड परिसरात घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र लक्ष्मी नारायण ओझा (वय ५४, रा. जिल्हापेठ) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रिक्षा चालक आकाश माचरे रा. कंजरवाडा याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिल्हापेठ परिसरात राजेंद्र ओझा हे वास्तव्यास होते. दि. २९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ते जळगाव स्मशान भूमी रोड परिसरातून पायी जात होते. होते. यावेळी आकाश माचरे (रा. कंजरवाडा) याने त्याच्या ताब्यातील (एमएच १९, बीएम २४०२) क्रमांकाच्या मालवाहू रिक्षाने ओझा यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ओझा हे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओझा यांचे भाऊ गजेंद्र ओझा यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आकाश माचरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.