असोदा येथे पाच जणांकडून ५० हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

0

जळगाव :- उसनवार दिलेल्या ५० हजार रुपये परत मागितल्याचा राग आल्याने एकमेकांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आसोदा येथे घडली. यामध्ये अजय तुकाराम पाटील (२३, रा. आसोदा, ता. जळगाव) यांना पाच जणांनी। मारहाण करत, एकाने चाकूने वार केला, तर पैसे परत दिले नाहीत, म्हणून : मयूर विजय सपकाळे (२१, रा. आसोदा) यांनाच मारहाण केली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

नाश्ता गाडी लावणारे अजय पाटील यांनी गावातील तरुणाला ५० हजार रुपये दिले होते. १७ रोजी संबंधित व्यक्ती व त्याचे मित्र त्यांच्या गाडीवर आले. त्यावेळी अजय यांनी ५० हजार रुपये परत मागितले. त्याचा राग आल्यानेपाच जणांनी व्यावसायिकास मारहाण केली. एका जणाने चाकूने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसऱ्या गटातर्फे मयूर सपकाळे याने फिर्यादीत अजय पाटील यास पैसेनंतर देतो, सांगितल्याने त्याने धारदार वस्तूने वारकेले . याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.