जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून जयवंत सुभाष धनगर (३५, रा. डोमगाव, ता. जळगाव) यांना सात जणांनी बेदम मारहाण केली. यात लाकडी काठीने वार केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी जळगाव तालुक्यातील डोमगाव येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणाविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयवंत धनगर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रविवार दि. ७ जानेवारी रोजी ते शेतात काम करत असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील सात जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये एकाने लाकडी काठीने वार केल्याने धनगर यांना दुखापत झाली, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर मंगळवार, ९ जानेवारी रोजी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे हे करीत आहेत.