नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
कांद्याला योग्य तो भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून, कांदा दर प्रश्नी महाराष्ट्र (Maharashtra) राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव 2 ते 4 रुपयांपर्यंत कोसळलेत. त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील (Market Committee) कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. विक्री झालेल्या कांद्याला प्रति किलो दहा रुपये अनुदान मिळावं, अशी मागणी करण्यात आली आहे. विक्री होणाऱ्या कांद्याला 30 रुपये किलो हमीभावाची मागणी करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत लिलाव चालू होऊन न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आता कांद्याला योग्य तो भाव मिळतो कि नाही यावर सर्वांचेच लक्ष लागून आहे.