युवा शेतकऱ्यांमध्ये शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद : कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

0

कृषी आयुक्तांच्या जळगाव तालुक्यातील विविध शेती पीक क्षेत्र व प्रकल्पांना भेटी

जळगाव,;- शेतकऱ्यांनी शेतीत कृषी संलग्न व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करावा. युवकांनी शेतीकडे उद्योग – व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद युवकांमध्ये असल्याचे प्रतिपादन कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी आज येथे केले.

जळगाव तालुक्यातील शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रक्षेत्रांना कृषी आयुक्तांनी आज भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते. सावखेडा खुर्द शिवारातील श्रीमती सुशिलाबाई आत्माराम साळुंखे यांच्या शेतातील निर्यातक्षम केळी उत्पादन, तसेच त्यांनी बी.आय. (बड इंजेक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन केलेल्य केळी पीक प्रक्षेत्रास भेट देऊन तांत्रिक व कमी खर्चाचे तंत्रज्ञान याबाबतची माहिती यावेळी कृषी आयुक्त डॉ .गेडाम यांनी जाणून घेतली.

कृषी आयुक्तांनी यावेळी मौजे करंज शिवारातील धोंडीराम सपकाळे यांनी लागवड केलेल्या नवीन कांदे बाग प्रक्षेत्रास टिश्यू कल्चर तंत्रज्ञान व पारंपारिक कंद लागवड या बाबत उत्पन्नात होत असलेले फरक, वेळेची बचत आदी बाबत चर्चा केली. मौजे कानळदा कृषी यांत्रिकीकरण उपभियान योजने अंतर्गत श्रीमती आशाताई अशोक राणे यांनी खरेदी केलेल्या हार्वेस्टर या यंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तसेच याच ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत गोपाल सपकाळे यांनी उभारलेल्या सद्गुरु केळी प्रक्रिया उद्योग येथे भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी उपस्थित असलेल्या युवा शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना युवकांनी कृषी संलग्न व्यवसायासोबतच अन्न प्रक्रिया उद्योग व कृषी निर्यातीत आपले भवितव्य घडवल्यास शेती क्षेत्रात निश्चितचपणे परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी डॉ.प्रविण गेडाम यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी युवकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या प्रक्षेत्र भेटीवेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, तंत्र अधिकारी दिपक ठाकुर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, मंडळ कृषी अधिकारी अमित भामरे, कृषी पर्यवेक्षक डी.डी.सोनवणे,योगेश अत्रे, राहुल साळुंखे, प्रविण सोनवणे, भरत पाटील, कमलेश पवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोनू कापसे, विवेक चव्हाण व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी कृषीभूषण अनिल सपकाळे, मोहनचंद सोनवणे, राजेंद्र पाटील, ॲड.हर्षल चौधरी, किशोर पाटील, प्रदिप पाटील, डॉ.सत्वशील जाधव,संजय पाटील, संजय सपकाळे, किरण साळुंखे व शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण्यासाठी गिरीश गडे, श्रीमती शुभांगी पाटील, महोज्जीम खान, रुपाली दिक्षित, उज्वला पगारे, दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी, सुवर्णा साळुंखे, प्रशांत पाटील, साथी या संस्थेचे प्रमोद बोराखडे, व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत सामाजिक क्षेत्रातील काम करणा-या संस्था राष्ट्रविकास संस्था, गोदावरी फाउंडेशन, टिसीआय फाउंडेशन, आधार संस्था, अमळनेर / जळगाव, सानेगुरुजी फाउंडेशन, अमळनेर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयातंर्गत पारोळा, भुसावळ, धरणगाव, यावल, न्हावी, भडगाव, येथे ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी केंद्राद्वारे माहिती पुस्तिका, पोस्टर्स प्रदर्शन, प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.