कबचौ विद्यापीठाचा २४ मे रोजी दीक्षांत समारंभ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ २४ मे रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे. यंदाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व युजीसीचे व्हाइस चेअरमन भूषण पटवर्धन यांची उपस्थिती राहणार आहे.

गेल्या दोन वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने पार पडला होता. यंदा पहिल्यांदाच ऑफलाईन पध्दतीत हा सोहळा पार पडणार आहे. या दीक्षांत समारंभात स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. पीएच.डी पदवी देखील देण्यात येणार आहेत.

दरम्यान, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली असून यात १२४ अभ्यासक्रमांच्या ३७३ विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यातून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक बहाल करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.