दोन सख्ख्या बहिणींना धक्काबुक्की करत विनयभंग

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील दोन बहिणींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून भाडेकरूंमध्ये हाणामारी होवून विनयभंग झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात दोन बहिणी ह्या भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या घराच्या शेजारी मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी  हे दाम्पत्य राहते. गुरूवार २८ जुलै रोजी सायंकाळी घरात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन्ही बहिणी आणि दाम्पत्यामध्ये वाद झाला. वाद वाढल्याने हाणामारी झाली. यातील मनोज कोळी याने दोन्ही बहिणींशी धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला.

याप्रकरणी रात्री ९ वाजता दोन्ही बहिणींनी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार  शनीपेठ पोलीस ठाण्यात मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.