जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यासह जळगाव शहरात सध्या थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. थंडीचा कडाका असह्य झाल्यामुळे उघड्यावर दिवस काढणारे चार बेघर जळगाव शहरात मृत्युमुखी पडले आहेत.
सोमवार 31 जानेवारीच्या मध्यरात्री नंतर जळगाव शहरातील तपमान सुमारे साडेसात अंशापर्यंत घसरले होते. या गारठ्यात चौघे बेघर सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस झाले आहे.
जळगाव शहरातील पांडे डेअरी चौक, निमखेडी रस्ता, रेल्वे स्टेशन व जिल्हापेठ परिसर अशा ठिकाणी चौघे बेघर आढळून आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.