धक्कादायक; माथेफिरू पोलीस कॉन्स्टेबलने गोळ्या झाडात केली ३ प्रवाशांची हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जयपुर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आज सकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे हा गोळीबार एका आरपीएफ कॉन्स्टेबलनं केला आहे. त्याचं हे टोकाचं पॉल उचलण्यामागे प्रवाशांसोबत वाद झाल्याचे सांगितलं जात आहे.

पण, कारण मात्र दुसरं असल्याचे पश्चिम रेल्वेच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यानं स्वतःवरील नियंत्रण गमावलं आणि त्याच्या वाटेत जो कोणी येईल त्याच्यावर त्यानं गोळ्या झाडल्या. यामध्ये पहिल्यांदा त्यानं आपला वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर प्रवाशांवर गोळ्या झाडल्या प्रवाशांसोबत त्याचा कुठलाही वाद झालेला नव्हता, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली.

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. चेतन सिंह असं आरोपी कॉन्स्टेबलचं नाव असून, त्यानं गोळ्या झाडल्यामुळे तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रेनची चेन पुलिंग करत त्यानं दहिसर जवळून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.