प्रवाशांनो लक्ष द्या ! रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रेल्वे प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा नाही तर तुमची मोठी गैरसोय होईल. भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

गोरखपूर- भटनी सेक्शन दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे दि. ११ सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या गोरखपूरपर्यंत जाणार नाही. काही रेल्वे या भटनीत तर काही रेल्वे महूतच थांबतील आणि तेथूनच सुटतील. गोरखपूर-भटनी सेक्शन दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम घेण्यात आले आहे. यासाठी गाडी क्र. १२१६५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर ही ८ रोजी भटणी स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येत आहे. भटनी ते गोरपूर दरम्यानची गाडी रद्द असले.

गाडी क्रमांक १२१६६ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही ८ व ९ रोजी भटनी स्टेशन येथून सुटेल. गोरखपूर-भटनी दरम्यान गाडी रद्द राहील. गाडी क्र. ११०३८ गोरखपूर-पुणे ही ९ रोजी महू येथून सुटेल. गोरखपूर ते मऊ दरम्यान गाडी रद्द राहील. गाडी क्र. ०१०२८ गोरखपूर -दादर दरम्यान विशेष गाडी ९ व ११ रोजी महू स्टेशन येथून सुटेल. गोरखपूर ते महू दरम्यान गाडी रद्द राहील. म्हणून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.