लोकशाही न्यूज नेटवर्क
हनिमूनसाठी गोव्याला जायचं सांगून अयोध्येला नेल्याने मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका महिलेनं घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या विचित्र घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये सुरु आहे. या जोडप्याचं कोर्टाकडून समुपदेशन केलं जात आहे. एका रिलेशनशिप काऊन्सिलरनं याबाबत माहिती दिली आहे.
रिलेशनशिप काउन्सिलर शाईल अवस्थी यांनी सांगितली की, या जोडप्याचं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न झालं आहे. यातील नवरा मुलगा हा आयटी इंजिनिअर आहे. लग्नानंतर नववधूने आपल्या पतीला परदेशात हनिमूनला जाण्यासाठी हट्ट धरला. पण तिच्या नवऱ्यानं आपण भारतातील एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊयात तशी माझ्या आई-वडिलांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं होतं. पण या वादात त्यांचं हनिमूनसाठी गोव्याला जायचं ठरलं.
पण यानंतरही गोवा ट्रीपच्या एक दिवस आधी नवऱ्यानं आपल्याला आपण अयोध्या आणि वाराणसीला चाललो आहोत, कारण माझ्या आईची तशी इच्छा असल्याचं सांगितलं. यानंतर या जोडप्यानं अयोध्या-वाराणसी असे तिकीट केले. पण परतल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला, यानंतर महिलेनं थेट पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
अवस्थी म्हणाली की, महिलेनं आरोप केला की पटीनं तिचा विश्वास तोडला आहे. आणि असाही आरोप केला आहे के, त्यांनी लग्नाच्या सुरुवातीपासूनच आपल्यापेक्षा आपल्या वित्तहारीत कुटुंबाला प्राधान्य दिल, पण आता या दोघांनी आपलं नातं संपवू नये यासाठी समुपदेशन सुरु केलं आहे.