Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अध्यात्म»सावधान ! 8 दिवसांचा अशुभ काळ; होळीपर्यंत ही कामं टाळा
    अध्यात्म

    सावधान ! 8 दिवसांचा अशुभ काळ; होळीपर्यंत ही कामं टाळा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 10, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    हिंदू शास्त्रामध्ये काही शुभ – अशुभ काळ सांगितला असून या काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये याची देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा होलाष्टक हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो. होळीच्या आधीच्या 8 दिवसांना होलाष्टक म्हणतात. होळी दहनाच्या दिवशी होलाष्टक संपते. होलाष्टकाच्या काळात सर्व प्रमुख ग्रह उग्र स्वरूपाचे असल्याने या काळात कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत.

    होलाष्टकाची आख्यायिका

    होलाष्टकाच्या काळात, भक्त प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी अनेक त्रास दिले होते जेणेकरून तो हरिभक्ती सोडून हिरण्यकश्यपची पूजा करेल. पण, प्रल्हादानं ते मान्य केले नाही आणि विष्णूची पूजा चालू ठेवली. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा वध करून भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. अशी आख्यायिका सांगण्यात येते.

    होलाष्टकाची सुरुवात आणि समाप्ती 

    या वर्षी फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथी 16 मार्च रोजी रात्री 09:39 पासून सुरू होत असून 17 मार्च रोजी सकाळी 09:53 वाजता समाप्त होत आहे. उदयतिथीनुसार फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथी 17 मार्च रोजी आहे, म्हणून 17 मार्चपासून होलाष्टक सुरू होत आहे. तर 17 मार्चपासून सुरू होणारे होलाष्टक फाल्गुन पौर्णिमेला होळी दहनाने समाप्त होईल. यंदा होळी दहन 24 मार्चला होणार आहे. त्यामुळे 24 मार्चला होळाष्टकही संपणार आहे. दुसऱ्या दिवशी 25 मार्च रोजी धूलिवंदन साजरे केले जाते.

    होलाष्टकात ही कामे करू नये 

    1) कोणतंही शुभ कार्य करू नये.

    2) कोणतेही नवीन काम, नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू करू नये.

    3) लग्न, बारसं, गृहप्रवेश यांसह कोणतेही मोठे संस्कार किंवा विधी करू नयेत.

    होलाष्टात काय करावे?

    1) होलाष्टकचे 8 दिवस तपश्चर्येसाठी, मंत्र, पठणासाठी असतात.

    2) या काळात चांगले आचरण, संयम आणि ब्रह्मचर्य पाळा.

    3) होळी दहनाच्या ठिकाणी दररोज लाकडाचे छोटे तुकडे गोळा करून ठेवावीत.

    4) या काळात व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र, पैसा आणि इतर वस्तूंचे दान करावे. यामुळे पुण्य प्राप्त होते.

    5) होलाष्टकचे 8 दिवस जप, तंत्र, मंत्र साधना आणि अध्यात्मिक कार्यासाठी चांगले आहेत. तंत्र साधना आणि सिद्धीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे.

     

    #holi Holashtak Holashtak 2024
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अक्रूर महाराजांच्या कीर्तनातून त्याग, भक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश

    June 3, 2026

    कलीयुगातून तरण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन!

    May 28, 2026

    नवापूरच्या एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif