गळफास घेत तरुणाने संपविले जीवन

0

जळगाव ;- घरात कोणीच नसतांना २८ वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुषण प्रभाकर माळी (वय २८) असे मयत तरुणाचे नाव आहे. शहरातील व्यंकटेश नगरात भूषण माळी हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. खासगी कंपनीत काम करुन तो कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिणी असा परिवार आहे. गुरवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घरात कोणीही नसतांना भूषण याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला.

आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्यांनी तात्काळ भूषणला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.