शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले

0

जळगाव-;- मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटीकेजवळ एका शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आजा २१ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाकूर हरि राठोड (वय-४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ठाकूर राठोड हे मेहरूण परिसरातील एकनाथ भागात शेती सांभाळून आपल्या कुटुंबियांसह राहात होते. शुक्रवारी २० ऑक्टोबर रेाजी रात्री त्यांनी कुटुंबासोबत जेवण करून गुरांच्या गोठ्याजवळ ते झोपले होते. गुरांना चारा आणायचा असल्याने त्यासाठी ते वनीकरण विभागाकडेअसलेल्या परिसरात गेले. त्या ठिकाणी असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या परिसरात काही गुराखी गेले असता त्यांना ठाकूर हरी राठोड यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांनासांगितल्याने तात्काळ पोलिसांनी धाव घेत पोलिस नाईक मुदस्सर काझी हे घटनास्थळी पोपोहचून नागरिकांच्या मदतीने राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास शिवदास नाईक, फिरोज तडवी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी कमलाबाई, तीन मुले, एक सून असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.