आर्थिक विवंचनेतुन शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर तालुक्यातील पातोंडी येथे आर्थिक विवंचनेतुन एका ४० वर्षीय शेतकऱ्याने विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पातोंडी ता. रावेर येथे किशोर श्रावण पाटील (वय ४०) हे सकाळी स्वता:च्या शेतात गेले व तेथे काहीतरी विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. मयत किशोर पाटील यांना एक मुलगा असुन तो ही कर्णबधीर आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक देखिल घटना स्थळाकडे घाव घेतली.

दरम्यान आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा अंदाज उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.