लोकशाही न्युज नेटवर्क
एरंडोल – तालुक्यात अजुनही २५ते ३०टक्के शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटाच्या दुहेरी चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांला मदतीचा हात कधी मिळणार..? त्याच्या हक्काच्या विम्याची रक्कम मिळण्यास विलंब व दिरंगाई हेतुत: तर होत नाही ना? असे शंका वजा प्रश्न शेतकऱ्यांच्या गोटातुन विचारले जात आहेत.
एरंडोल तालुक्यात पिकविमा योजनेसाठी ७२६१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केली असता त्यापैकी ६१२२ इतके पाञ असुन ११३९ एवढे अपाञ ठरले आहेत तर ४८५१ शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला असुन आहे.१२७० शेतकरी अजुनही पिकविम्याची प्रतीक्षा करीत आहेत अशी माहीती सुञांनी दिली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post