धापा बांधण्याच्या कारणावरून दोघांना मारहाण

0

पहूर , लोकशाही नेटवर्क
गटारीवर धापा बांधण्याच्या कारणावरून तरुणासह घरातील इतर दोघांना लोखंडी आसारीने मारहाण करून गंभीर दुखापत

जामनेर तालुक्यातील गोद्री येथे घडली. या घटनेबाबत गुरूवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस स्टेशनला ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अशोक विजयसिंह नाईक (वय-३०) रा. गोद्री ता. जामनेर यांना २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अशोक नाईक हे घरी असताना त्यांच्या घरासमोर गटारीचेवरील धापा बांधण्याचा कारणावरून वाद झाला. यामध्ये अनिल कोंडू नाईक, सुनील कोंडू नाईक, कोंडू वसंतदास नाईक, रेखाबाई कोंडू नाईक, रंजना सुनील नाईक आणि रोशनी अनिल नाईक सर्व रा. गोद्री ता. जामनेर यांनी लोखंडी सळई घेऊन अशोक नाईक व त्यांच्या घरातील विजय नाईक, ईश्वर नाईक यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर अशोक नाईक यांनी गुरुवार २ मार्च रोजी पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिंपी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.