लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी मुलगी दागिने घेऊन पसार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

घरात लग्नाचा माहोल, नव्या सुनेचा नुकताच गृहप्रवेश. लग्न नीट पार पडल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते. पण हसतंखेळत घर अचानक शांत झालं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नव्या सुनेने केलेल्या प्रतापामुळे लग्नघरात शोककळा पसरली. हरियाणातील रेवाडी येथे ही दुर्दैवी घडली आहे.

लग्नाचा माहोल, नव्या सुनेचा नुकताच गृहप्रवेश, आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद. आजूबाजूचे लोकी सुद्धा नव्या सुनेला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून येत होते.पण हसतंखेळतं घर अचानक शांत झालं, असा सन्नाटा पसरला की कोणाच्याही मनात धडकी भरावी. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नव्या सुनेने केलेल्या प्रतापामुळे लग्नघरात शोककळा पसरली. हरियाणातील रेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

लग्नानंतर अवघ्या तीन दिवसात नववधू घरातून गायब झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. पण जातांना ती एकटीच गेली नाही, तर घरातील होतं नव्हतं ते सगळं मौल्यवान सामान, लाखो रुपयांचे दागिनेही घेऊन तिने पळ काढला. तिचा हा प्रताप जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याप्रकरणी पीडित कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बावळ विधानसभेच्या टंकडी गावातील लक्ष्मीनारायण उर्फ राजकुमार शर्मा यांचा विवाह उत्तर प्रदेशातील तरुणीशी झाला. एका मध्यस्थाच्या माध्यमातून हे लग्न ठरवले होते. राजकुमाने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घरच्यांनी मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडले होते. वधूसोबत तिचा भाऊ आणि वहिनीही आले होते. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते, आजूबाजूचे लोकही वधूला पाहण्यासाठी, तिला आशिर्वाद देण्यासाठी येत होते.

पहाटेच्या सुमारास भिंत अलांडून नवी नवरी पसार
सगळं काही आनंदाचं सुरु होते. पण लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वाढू गुपचुप पळून जाईल, हे कुटुंबातील कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. या घटनेनंतर संपूर्ण घराला धक्का बसला आहे. सासरच्यांनी वधूच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यापैकी कोणीच, काहीही बोलायला तयार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.