चौघांकडून शेतकऱ्याला मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

0

अमळनेर ;- काहीही कारण नसताना एका शेतकऱ्याला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिदास सुभाष पाटील वय-५२, रा. चोपडाई ता. अमळनेर हे शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते त्यांच्या चोपडाई शिवारातील शेतात काम करत असतांना काहीही कारण नसताना निशांत ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी रामदास पाटील आणि गोकुळ रामदास पाटील सर्व रा. नाव्हरी ता. अमळनेर या चार जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. व तेथून चौघेजण पसार झाले.

जखमी अवस्थेत रोहिदास पाटील यांना गावातील नातेवाईकांनी धुळे येथे शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार घेतल्यानंतर अखेर शनिवारी १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे निशांत ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी रामदास पाटील आणि गोकुळ रामदास पाटील सर्व रा. नाव्हरी ता. अमळनेर या चौघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.