Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»पांढऱ्या सोन्याला अच्छे दिन ! प्रथमच 12 हजारांचा टप्पा ओलांडला
    कृषी

    पांढऱ्या सोन्याला अच्छे दिन ! प्रथमच 12 हजारांचा टप्पा ओलांडला

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 26, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या भावात चढउतार पाहायला मिळत होते. यंदा प्रथमच अकोटमध्ये पांढऱ्या सोन्याला अच्छे दिन आले असून बारा हजार रुपये दर मिळाला आहे.

    कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोट बाजार समितीत कापूस (जाड) हा 12 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली आहे. गत 50 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच कापसाने 12 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच अकोट येथील बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल दर दहा हजार रुपये भाव मिळत आहे.

    त्यामुळे वऱ्हाडासह नागपूर जिल्ह्यातील कापूसही अकोटमध्ये विक्रीसाठी येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाला उच्चांकी दर मिळत आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. शिवाय उत्पादन खर्चही वाढला. दरम्यान शेतकऱ्यांकडे आर्थिक चणचण असल्याने याचा फायदा स्थानिक व्यापाऱ्यांना झाला.

    नाईलाजास्तव मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गावातच स्थानिक व्यापाऱ्याकडे कमी भावात कापूस विकला. त्यामुळे वाढत्या भावाचा सर्वाधिक फायदा स्थानीक व्यापाऱ्यांना झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी बोंड अळी, नैसर्गिक संकट यामुळे कापसाच्या उत्पादनात घट पाहायला मिळत आहे. शिवाय कापसाचा उत्पादन खर्चही परवडत नाही. म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले.

    मात्र यावर्षी कापूस कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते क्विंटल मागे बारा हजार रुपये दर मिळलाय. बारा हजार रुपये दर मिळाला असला तरी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मुळे कापूस परवडत नाही. त्यामुळे हेच दर का राहिल्यास कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

     

    Akola Akot Bazar Samiti Cotton Market
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif