नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) देशाचा गौरव वाढवला आहे. सुमारे 22 दिवसांच्या प्रवासानंतर, चांद्रयान-3 ने पृथ्वीची कक्षा ओलांडली आहे आणि आता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे वेगाने पुढे जात आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरताच भारत असा इतिहास घडवणार आहे, जो आजपर्यंत जगातील कोणताही देश घडवू शकला नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पूर्णपणे अंधार आहे. कोणत्याही देशाच्या शास्त्रज्ञांना अद्याप याविषयी कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. आतापर्यंत जगातील कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला नाही.
इस्रोने म्हटले आहे की, चांद्रयान-3 अंतराळयानाने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यापासून चंद्राच्या जवळपास दोन तृतीयांश अंतर कापले आहे. आता 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणे अपेक्षित आहे. प्रक्षेपण झाल्यापासून, चांद्रयान-3 ची कक्षा वाढवण्याच्या ऑपरेशनमध्ये पाच वेळा यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे. 1 ऑगस्ट रोजी यानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने उचलण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि यानाला ‘ट्रान्सलुनर ऑर्बिट’मध्ये ठेवण्यात आले. इस्रोच्या म्हणण्यानुसार आज आणखी एका महत्त्वाच्या प्रयत्नात हे यान चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे.
ISRO tweets, "Chandrayaan-3 has been successfully inserted into the lunar orbit. A retro-burning at the Perilune was commanded from the Mission Operations Complex (MOX), ISTRAC, Bengaluru. The next operation – reduction of orbit – is scheduled for Aug 6, 2023, around 23:00 Hrs.… pic.twitter.com/qup163DuXW
— ANI (@ANI) August 5, 2023
चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले…
राष्ट्रीय अंतराळ संस्थेने शनिवारी सांगितले की, हे यान चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. पुढील टप्पा 6 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. चांद्रयान-३ चंद्राच्या सर्वात जवळ असताना हा प्रयत्न करण्यात आल्याचे इस्रोने म्हटले आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, ते 23, 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल.