दारुड्याने दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून केली निर्घृण हत्या

0

चंद्रपूर ;- काही दिवसांपासून विक्षिप्त वागणाऱ्या दारुड्या बापानेच दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. नागभीड तालुक्यातील मौशी येथे रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हे तिहेरी हत्याकांड घडले. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.

पोलिसांनी आरोपी अंबादासलक्ष्मण तलमले (४५) याला अटक केली असून, अलका अंबादास तलमले (४०), प्रणाली अंबादास तलमले (२१) व तेजस्विनी आंबादास तलमले (१९) अशी मृत पत्नी व मुलींची नावे आहेत. दरम्यान, तिहेरी हत्याकांडामागील रहस्य पोलिसांकडून शोधले जात आहे. तालुकास्थळापासून १५
किमी अंतरावर असलेल्या माझी गावात आरोपी अंबादास तलमले व त्याचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राहात होते. आरोपीला तीन मुली व एक मुलगा असून, मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. दरम्यान, आरोपी गेल्या काही दिवसांपासून रात्री झोपताना कुऱ्हाड सोबत घेऊन झोपत होता. याबाबत कुटुंबीयांनी विचारणा केली असता स्वतःच्या रक्षणासाठी कुन्हाड सोबत ठेवत असल्याचे तो सांगत होता. या हल्ल्यात पत्नी अल्का तलमले (वय 40 वर्ष) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20 वर्ष), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20 वर्ष) या तिघांची अंबादासने निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि यातील संशयित आरोपी असलेल्या अंबादासला नागभीड पोलिसांनी अटक केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.