चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय जनजाती आयोगाने दिला आहे. जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात हा आदेश असून एका सिमेंट कंपनीने ही जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याप्रकरणी हि कारवाई आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने समन्स जारी करूनही त्याचे पालन न केल्याप्रकरणी आयोगाने हा आदेश दिला आहे. याप्रकरणी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या या आदेशामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहेत.