भुसावळ हत्याकांडातील आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यात कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (३३) व राकेश भोलानाथ साळुंखे (२८) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार, व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री १० विजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परिसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळ चौकात घडली होती. या घटनेत रमेश अमोल इंगळे (३२, सर्व रा. कंडारी) हे व विकी साळुंखे (३०) हे जखमी झाले होते तर त्यातील रमेश इंगळे यांचा उपचार सुरू असतांना गोदावरी रुग्णालयात रविवारी रमेश अमोल इंगळे (३२) सर्व रा. कंडारी हे व विकी साळुंखे (३०) हे जखमी झाले होते तर, त्यातील रमेश इंगळे यांचा उपचार सुरु असतांना गोदावरी रुग्णालयात रविवारी पहाटे तीन वाजता मृत्यू झाला. खून प्रकरणी विकास साळुंखे यांच्या फिर्यादीवरून दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवी भील, किरण सपकाळे व अन्य चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खून प्रकरणी दीपक छगन तायडे व मनोज श्रावण मोरे व किरण सपकाळे या तीन संशयितांना अटक करण्यात आली.

खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपार पोलिस निरीक्षक गजानन पडघन व भाजारपेठेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.