भाईंदर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुसळधार पावसामुळे भाईंदर (Bhayander) मध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल कारण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण दाबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास हि घटना घडल्यानांतर स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेत काही लोकांना बाहेर काढले आहे. अग्निशमन दल, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे.
गेल्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे इमारतीचा भाग कोसळला असल्याचे समोर येत आहे. इमारत पुढच्या बाजूने जीर्ण झाली होती. असे असतांना देखील धोकादायक इमारतीत नागरिक वास्तव्यास होते. यामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. स्टेशन समोर असलेल्या जुन्या इमारतीचा समोरील भाग सकाळच्या सुमारास कोसळला. या इमारतीत अनेक दुकाने आहे. इमारतीखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केले. अग्नीशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्नीशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ बचाव कार्या सुरु केले.