जळगाव: –एका २० वर्षीय तरुणाला कामधंदे करून पैसे कमव असा वडिलांनी सल्ला दिल्याचा मनात राग ठेऊन तरुणाने रागाच्या भारत घर सोडून निघून गेल्याचा प्रकार तांबापुरा येथे घडला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
सादीक सलीम पिंजारी (वय २०, रा. तांबापुरा) असे या तरुणाचे नाव असून तो हा दि. १७ मार्चपासून घर सोडून निघून गेला आहे. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो मिळून न आल्याने अखेर त्याचे वडील सलीम पिंजारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर मुलाविषयी माहिती मिळाल्यास कळवण्याचे आवाहन पोलिस व कुटुंबीयांनी केले आहे.