अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चार शंकराचार्य उपस्थित राहणार नाही

0

अयोध्या ;– येत्या २२ जानेवारीला संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त जल्लोष साजरा केला जाणार आहे. २२ जानेवारीला राम मंदिरा निमित्त रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अशातच या कार्यक्रमाला चार शंकराचार्य विरोध करत असल्याचे समोर येत आहे, स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येत न येण्याचे कारण माध्यमांशी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास येणार नाही. कारण मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नाही. मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही. हा विधी शास्त्रोक्त नाही. ज्या ठिकाणी शास्त्रीय विधीचे पालन होत नसेल त्या ठिकाणी आम्ही जाणार नाहीत. समारंभात फक्त टाळी वाजवण्यासाठी आम्ही का जावे? हा समारंभ राजकीय आहे. सरकारने याचे राजकीयकरण केले आहे.

पश्चिमाम्नाय द्वारका शारदा पीठचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. परंतु समारंभात येणार नसल्याचे स्पष्ट केले. दक्षिणाम्नाय श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य महा सन्निधानम स्वामी भारती तीर्थ यांनी या शुभ प्रसंगी देशवासियांनी शुभेच्छा देत समारंभाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. स्वामी भारती तीर्थ आपला सोहळ्यास विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

वैष्णव संत महंतांनी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व विधीनुसार असणार आहे. किष्किंधामधील हनुमान जन्मस्थानावरील महंत विद्यादास यांनी सांगितले की, जगात हजारो मंदिरांमध्ये काम पूर्ण न होताच प्राणप्रतिष्ठा झाली आहे. शास्त्रांमध्ये यासंदर्भात कोणत्याही अटी नाहीत. अध्योध्या पंच पंच रामानंदीय निर्वाणी अखाडा अणीचे महंत धर्म दास म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्वात आधी शिखर पुजेचा विधान आहे. परंतु या ठिकाणी मूळ आणि जुन्या विग्रहाची पूजा होत आहे. आता फक्त रामलल्ला नवीन मंदिरात जात आहेत. यामुळे वेळ आणि मुहूर्त सर्व शास्त्रानुसार आहे. रामलल्ला आता आपल्या स्थायी निवासात जात आहे. यावर वाद योग्य नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.