विहिरीत उडी घेवून तरुणाची आत्महत्या

0

जळगाव: मानसिक रुग्ण असलेल्या तरुणाने विहरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी परिसरात घडली. पवन भिका जाधव (वय- २२, रा. सुभाषवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील सुभाषवाडीमध्ये पवन जाधव हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो मानसिक रुग्ण असल्याने त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. शनिवारी सकाळी तो कुटुंबियांना मी बाहेर जातो असे सांगून घरातून निघाला. त्यानंतर त्याचा भाऊ आणि वडील हे कामावर निघून

गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी पवन हा घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी संपुर्ण गावात आणि नातेवाईकांकडे पवनचा शोध घेतला. मात्र तरी देखील तो मिळून न येत असल्याने त्यांनी गावातील शेतांमध्ये पवनच्या शोध घेण्यासाठी निघाले.

 

गावाजवळ असलेल्या दिनेश चव्हाण यांच्या शेतातील विहरीजवळ पवनच्या अंगातील शर्ट, बुट आणि तंबाखूची पुडी पडलेली दिसून आली. दरम्यान, पवनच्या कुटुंबियांनी विहरीत डोकावून पाहिले असता, त्यांना पवनचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. त्यांनी लागलीच पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावून पवनचा मृतदेहबाहेर काढला. पवनच्या पश्चात आई, वडील, भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.